देवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळें
(PAGE NO -01-02)
प्रबोधनकारांची स्पष्ट छाप असणारं हे पुस्तक. असं पुस्तक लिहिणारा दुसरा कोणी झाला नाही, होण्याची शक्यताही नाही. ब्राम्हणवादी व्यवस्थेवरचा हा घणाघात प्रत्येक विचारी व्यक्तीने वाचलाच पाहिजे, असा आहे. यातील अनेक मतं स्फोटक आहेत, पण ती वाचल्यावर त्यावर टीका होऊ शकते पण कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही. ही छोटीशी पुस्तिका अनेक अर्थांनी क्रांतिकारी ठरली.
देवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळें कोणतीहि वस्तुस्थिती अथवा कल्पना प्रथमतः कितीहि चांगल्या हेतूच्या पोटी जन्माला आलेली असली, तरी काळ हा असला इलमी जादूगार आहे की आपल्या धांवत्या गतीबरोबर त्या हेतूचे रंग आरपार बदलून, त्या वस्तूला स्थितीला आणि कल्पनेला सुद्धां उलटी पालटी करून टाकतो. पूर्वी स्तुत्य वाटणारी गोष्ट आज सर्वथैव निंद्य कशी ठरते, याचेंच पुष्कळांना मोठें कोडें पडतें. पण तें उलगडणें फारसें कठीण नाही. काळ हा अखंड प्रगमनशील आहे. निसर्गाकडे पाहिलें तरी तोच प्रकार. कालचें मूल सदा सर्वकाळ मूलच रहात नाही. निसर्ग धर्मानुसार कालगतीबरोबरच त्याचेंहि अंतर्बाह्य एकसारखें वाढतच जातें आणि अवघ्या १८ वर्षांच्या अवधींत तेंच गोजिरवाणें मूल पिळदार ताठ जवानाच्या अवस्थेंत स्थित्यंतर व रूपांतर झालेलें आपणांस दिसतें. काळाच्या प्रगतीच्या तीव्र वेगामुळें झपाझप मागें पडणारी प्रत्येक वस्तुस्थिती आणि कल्पना, ती जर दगड धोंड्याप्रमाणें अचेतन अवस्थेंत असेल तर, प्रगमनशील डोळ्यांना ती विचित्र आणि निरुपयोगी दिसल्यास त्यांत काहींच चुकीचे नाही. जेथें खुद्द निसर्गच हरघडी नवनव्या थारेपालटाचा कट्टा अभिमानी, तेथें मनुष्याचा जीर्णाभिमान फोलच ठरायचा. जुनें ते सोनें ही म्हण भाषालंकारापुरती कितीहि सोनेमोल असली तरी जुन्या काळच्या सर्वच गोष्टी सोन्याच्या भावाने आणि ठरलेल्या कसाने नव्या काळाच्या बाजारांत विकल्या जाणे कधींच शक्य नाही. उत्क्रांतीच्या प्रवाहात वहाणीस लागलेल्या मानवांनी काळाच्या आणि निसर्गाच्या बदलत्या थाटाबरोबर आपल्या आचार विचारांचा थाट जर शिस्तवार बदलला नाहीं, तर कालगतीच्या चक्रांत त्यांच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्याशिवाय राहावयाच्या नाहीत.
निसर्गाचा न्याय आंधळा असला तरी कांटेकोर असतो. काळाची थप्पड दिसत नाही. पण त्याच्या भरधांव गतीपुढें कोणी आडवा येतांच छाटायला मात्र ती विसरत नाहीं. प्रवीण वैद्याची हेमगर्भ मात्रा वेळीं एखाद्या रोग्याला मृत्यूमुखांतून ओढून काढील. पण निसर्गाचा अपराधी ब्रह्मदेव आडवा पडला तरी शिक्षेवांचून सुटायचा नाहीं. पूर्वी कोणेकाळीं मोठ्या पुण्यप्रद वाटणा-या किंवा असणा-या गोष्टी आज जर पापाच्या खाणी बनलेल्या असतील, तर केवळ जुनें म्हणून सोनें एवढ्याच सबबीवर त्या पापाच्या खाणींचे देव्हारे माजविणें, म्हणजे जाणून बुजून काळाची कुचाळी करण्यासारखें आहे. अर्थात् असल्या कुचाळीचा परिणाम काय होणार, हें सांगणें नकोच. काळाच्या कुचाळक्या करण्यांत हिंदु जनांनी दाखविलेला पराक्रम आज त्यांच्या सर्वांगीण अधःपातांत स्पष्ट उमटलेला आहे. आजचा हिंदु समाज `समाज’ या नांवाला कुपात्र ठरलेला आहे. हिंदुधर्म हे एक भलें मोठें भटी गौडबंगाल आणि हिंदु संस्कृति म्हणजे एकबिन बुडाचें पिचकें गाडगे या-पेक्षा त्यांत विशेष असें काहींच नाहीं. उभ्या हिंदुस्थानांत दुर्गादेवी दुष्काळ बोकाळला तरी भटांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला भटेतरांच्या फाजील उदारपणामुळे कसलाच चिमटा बसत नाहीं. यामुळें धर्म संस्कृति संघटण इत्यादि प्रश्नांवर पुराणें प्रवचनांची तोंडझोड उठविण्याइतकी त्यांची फुप्फुसें अझून बरींच दणकट राहिलीं आहेत. म्हणून पुष्कळ बावळटांना अझून वाटतें कीं हिंदू समाज अझून जिवंत आहे. एकूण एक व्यक्ती द्वैतानें सडून गेलेली स्वच्छ दिसते, तरी `द्वैतांतच अद्वैत आहे’ म्हणून शंख करणारे तत्त्वज्ञानीही काहीं कमी आढळत नाहींत. परंतु वास्तविक स्थिती विचारवंताना पूर्ण कळलेली आहे. `द्वैतांतच अद्वैत’ अजमावण्याची भटी योगधारणा आमच्या सारख्या सुधारकांना जरी साधलेली नाहीं, तरी कालचक्राशीं हुज्जत खेळणा-या हिंदु समाजाचें भवितव्य अजमवण्यासाठी ज्योतिषीबुवांचे पायच कांहीं आम्हाला धरायला नको. सभोंवार परिस्थितीचा
जो नंगा नाच चालूं आहे. आत्मस्तोमांच्या टिकावासाठीं भिक्षुकशाहीची जीं कारस्थानें गुप्तपणानें सुरूं आहेत, आणि दिव्यावरच्या पतंगाप्रमाणें भटेतर लोक या कारस्थानांत जे फटाफट चिरडले जात आहेत, त्यावरून हिंदु समाजाचें भविष्य फारसें उज्वल नाहीं, असें स्पष्ट नमूद करायला या लेखणींस फार कष्ट होत आहेत.
निराशाजनक अशाहि अवस्थेंत हिंदुसमाज जगविण्याचे कांहीं राजमार्ग आमच्या धर्मबांधवास सुचविणें हेंच वास्तविक प्रबोधनाचें आद्य कर्तव्य आहे. राजमार्गाच्या आमच्या सूचना इतर डळमळीत सुधारकांप्रमाणें मोहरी एवढी गोळी आणि बालदीभर पाणी अशा नाजूक होमिओपॅथिक मासल्याच्या केव्हांही नसणार. प्रबोधनाच्या सूचना म्हणजे थेट सर्जरीच्या (शस्त्रक्रियेच्या). पत्करल्या तर प्रयोग करून पहा. तात्काळ दुःखमुक्त व्हाल. नाहींतर होमिओपॅथिक गुळण्या, भटांचे संघटणीं काढे निकाढे, पुराणप्रवचनांच्या, लेक्चरबाजीच्या मलमपट्ट्या आणि पक्षोपपक्षांची वातविध्वंसक नारायण तेलें आहेतच. बसा चोपडीत जन्मभर! आमचा आजचा धर्म हा मुळीं धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारें एक पाजी थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेतर दुनिया माणूस असून पशूपेक्षांही पशू बनली आहे. त्यामुळें आमच्या सर्वांगीण हलाकीचें मूळ भटांच्या पोटांत आहे. त्यांच्या गोडबोल्या ओठांत नव्हे; हे शेंकडा दहा लोकांना पटतां पटतांच एक शतक काळाच्या उदरांत गडप झालें. भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडांत देवळांचा नंबर पहिला लागतो. देवळांची उत्पत्ति ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदुधर्माची ही अगदी अलिकडची कमाई आहे. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचें जे आलय – वसतिस्थान – ते देवालय. आमचें तत्त्वज्ञान पहावें तों देव `चराचर व्यापुनि’ आणखी वर `दशांगुळें उरला’. अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतीच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरांत येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती! बोरीबंदरवर उतरलेल्या नवख्या प्रवाशाला सभागृहांत किंवा ताजमहालांत जाण्याचा जसा प्रसंग येतो, तसा `चराचर व्यापूनी दशांगुळें उरलेल्या’ देवाला सारें जग ओसाड चाकून हिंदूंच्या देवळांतच ठाणें देण्याचा असा कोणता प्रसंग ओढवला होता नकळे. बौद्ध धर्म हिंदुस्थानांतून परागंदा होईपर्यंत (म्हणजे इसवी सनाचा उदय होईपर्यंत) तरी भारतीय इतिहासांत देवळांचा कोठेंच कांहीं सुगावा लागत नाहीं. मग तोंपर्यंत आमचे हे हिंदु देव थंडीवा-यांत कुडकुडत आणि उन्हातान्हांत धडपडत पडले तरी कोठें होते? विद्वान संशोधकांच्या मतें आर्यांच्या ऋग्वेदकाळाची गणना जास्तींत जास्त इसवी सनापूर्वी ७००० वर्षे धरलीं, तर इतकीं वर्षे हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठें? आजचा त्यांचा देवळांतला थाट पाहिला, तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचाईत पण या देवांना सकाळची न्याहरी, दुपारी पंचपक्क्वानांचे भरगच्च ताट, पुन्हा तीन प्रहरी टिफीन आणि रात्री जेवण! याशिवाय दिवस सुना जायचा नाहीं. याशिवाय काकडआरत्या, माकड आरत्या, धूपार्त्या, शेजार्त्या, आहेतच.
कोट्यवधि गोरगरीब हिंदूंना, विशेषतः धर्मश्रद्धाळु हतभागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यांत गोणपाटाचें ठिगळहि मिळण्याची पंचाईत; पण आमच्या देवांना छपरीपलंग, मच्छरदाणी, गाद्यागिरद्यांशिवाय भागायचेंच नाहीं. खुशालचेंडू श्रीमंताप्रमाणे असल्या अखंड ऐश्वर्यात लोळणा-या देवांची स्थिति देवळें निर्माण होण्यापूर्वी कशी असावी, याची प्रत्यक्ष प्रदर्शने म्हणून तर भिक्षुकशाहीच्या आद्य शंकराचार्यांनी महारवाडे, मांगवाडे, धेडवाडे व भंगीवाडे निर्माण करून ठेवले असावेत काय? आमची खात्री आहे कीं, देवळें नव्हतीं तेव्हां आमच्या देवांच्या नशिबी महारामांगाप्रमाणेंच मसणवटीची कर्मप्राप्त राहणी लागलेली असावी, या राहणींतून आपला उद्धार व्हावा आणि काकड-माकड आरत्यांचे आणि घंटानगा-याचें ऐश्वर्य आपणांस लाभावें, म्हणून आमच्या देवळ्या देवांनी भटांची खूप पायचाटी केली; तेव्हा भटांच्या वेदोक्त मेहरबानीनें त्यांना तुरुंग वजा देवळांतली भटमान्य राजविलासी राहणी लाभली. देवळें आणि देव यांची आज कशीं विल्हेवाट लावावी याचा विचार करण्यापूर्वी, या दोन संस्था मूळ अस्तित्वांत कशा आल्या, याची रूपरेषा वाचकांपुढे ठेवणें जरूर आहे. यासाठी आर्यसंस्कृतीच्या जोडीनेंच इजिप्त आणि मेसापोटेमियाकडे परिणत होत असलेल्या सेमेटिक लोकांच्या संस्कृतीचा प्राचीन इतिहास आपण संक्षेपानें समालोचन केला पाहिजे. आर्यांप्रमाणेंच सेमेटिक लोक गुरेंढोरें पाळून, आज
(PAGE NO -01-02)
प्रबोधनकारांची स्पष्ट छाप असणारं हे पुस्तक. असं पुस्तक लिहिणारा दुसरा कोणी झाला नाही, होण्याची शक्यताही नाही. ब्राम्हणवादी व्यवस्थेवरचा हा घणाघात प्रत्येक विचारी व्यक्तीने वाचलाच पाहिजे, असा आहे. यातील अनेक मतं स्फोटक आहेत, पण ती वाचल्यावर त्यावर टीका होऊ शकते पण कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही. ही छोटीशी पुस्तिका अनेक अर्थांनी क्रांतिकारी ठरली.
देवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळें कोणतीहि वस्तुस्थिती अथवा कल्पना प्रथमतः कितीहि चांगल्या हेतूच्या पोटी जन्माला आलेली असली, तरी काळ हा असला इलमी जादूगार आहे की आपल्या धांवत्या गतीबरोबर त्या हेतूचे रंग आरपार बदलून, त्या वस्तूला स्थितीला आणि कल्पनेला सुद्धां उलटी पालटी करून टाकतो. पूर्वी स्तुत्य वाटणारी गोष्ट आज सर्वथैव निंद्य कशी ठरते, याचेंच पुष्कळांना मोठें कोडें पडतें. पण तें उलगडणें फारसें कठीण नाही. काळ हा अखंड प्रगमनशील आहे. निसर्गाकडे पाहिलें तरी तोच प्रकार. कालचें मूल सदा सर्वकाळ मूलच रहात नाही. निसर्ग धर्मानुसार कालगतीबरोबरच त्याचेंहि अंतर्बाह्य एकसारखें वाढतच जातें आणि अवघ्या १८ वर्षांच्या अवधींत तेंच गोजिरवाणें मूल पिळदार ताठ जवानाच्या अवस्थेंत स्थित्यंतर व रूपांतर झालेलें आपणांस दिसतें. काळाच्या प्रगतीच्या तीव्र वेगामुळें झपाझप मागें पडणारी प्रत्येक वस्तुस्थिती आणि कल्पना, ती जर दगड धोंड्याप्रमाणें अचेतन अवस्थेंत असेल तर, प्रगमनशील डोळ्यांना ती विचित्र आणि निरुपयोगी दिसल्यास त्यांत काहींच चुकीचे नाही. जेथें खुद्द निसर्गच हरघडी नवनव्या थारेपालटाचा कट्टा अभिमानी, तेथें मनुष्याचा जीर्णाभिमान फोलच ठरायचा. जुनें ते सोनें ही म्हण भाषालंकारापुरती कितीहि सोनेमोल असली तरी जुन्या काळच्या सर्वच गोष्टी सोन्याच्या भावाने आणि ठरलेल्या कसाने नव्या काळाच्या बाजारांत विकल्या जाणे कधींच शक्य नाही. उत्क्रांतीच्या प्रवाहात वहाणीस लागलेल्या मानवांनी काळाच्या आणि निसर्गाच्या बदलत्या थाटाबरोबर आपल्या आचार विचारांचा थाट जर शिस्तवार बदलला नाहीं, तर कालगतीच्या चक्रांत त्यांच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्याशिवाय राहावयाच्या नाहीत.
निसर्गाचा न्याय आंधळा असला तरी कांटेकोर असतो. काळाची थप्पड दिसत नाही. पण त्याच्या भरधांव गतीपुढें कोणी आडवा येतांच छाटायला मात्र ती विसरत नाहीं. प्रवीण वैद्याची हेमगर्भ मात्रा वेळीं एखाद्या रोग्याला मृत्यूमुखांतून ओढून काढील. पण निसर्गाचा अपराधी ब्रह्मदेव आडवा पडला तरी शिक्षेवांचून सुटायचा नाहीं. पूर्वी कोणेकाळीं मोठ्या पुण्यप्रद वाटणा-या किंवा असणा-या गोष्टी आज जर पापाच्या खाणी बनलेल्या असतील, तर केवळ जुनें म्हणून सोनें एवढ्याच सबबीवर त्या पापाच्या खाणींचे देव्हारे माजविणें, म्हणजे जाणून बुजून काळाची कुचाळी करण्यासारखें आहे. अर्थात् असल्या कुचाळीचा परिणाम काय होणार, हें सांगणें नकोच. काळाच्या कुचाळक्या करण्यांत हिंदु जनांनी दाखविलेला पराक्रम आज त्यांच्या सर्वांगीण अधःपातांत स्पष्ट उमटलेला आहे. आजचा हिंदु समाज `समाज’ या नांवाला कुपात्र ठरलेला आहे. हिंदुधर्म हे एक भलें मोठें भटी गौडबंगाल आणि हिंदु संस्कृति म्हणजे एकबिन बुडाचें पिचकें गाडगे या-पेक्षा त्यांत विशेष असें काहींच नाहीं. उभ्या हिंदुस्थानांत दुर्गादेवी दुष्काळ बोकाळला तरी भटांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला भटेतरांच्या फाजील उदारपणामुळे कसलाच चिमटा बसत नाहीं. यामुळें धर्म संस्कृति संघटण इत्यादि प्रश्नांवर पुराणें प्रवचनांची तोंडझोड उठविण्याइतकी त्यांची फुप्फुसें अझून बरींच दणकट राहिलीं आहेत. म्हणून पुष्कळ बावळटांना अझून वाटतें कीं हिंदू समाज अझून जिवंत आहे. एकूण एक व्यक्ती द्वैतानें सडून गेलेली स्वच्छ दिसते, तरी `द्वैतांतच अद्वैत आहे’ म्हणून शंख करणारे तत्त्वज्ञानीही काहीं कमी आढळत नाहींत. परंतु वास्तविक स्थिती विचारवंताना पूर्ण कळलेली आहे. `द्वैतांतच अद्वैत’ अजमावण्याची भटी योगधारणा आमच्या सारख्या सुधारकांना जरी साधलेली नाहीं, तरी कालचक्राशीं हुज्जत खेळणा-या हिंदु समाजाचें भवितव्य अजमवण्यासाठी ज्योतिषीबुवांचे पायच कांहीं आम्हाला धरायला नको. सभोंवार परिस्थितीचा
जो नंगा नाच चालूं आहे. आत्मस्तोमांच्या टिकावासाठीं भिक्षुकशाहीची जीं कारस्थानें गुप्तपणानें सुरूं आहेत, आणि दिव्यावरच्या पतंगाप्रमाणें भटेतर लोक या कारस्थानांत जे फटाफट चिरडले जात आहेत, त्यावरून हिंदु समाजाचें भविष्य फारसें उज्वल नाहीं, असें स्पष्ट नमूद करायला या लेखणींस फार कष्ट होत आहेत.
निराशाजनक अशाहि अवस्थेंत हिंदुसमाज जगविण्याचे कांहीं राजमार्ग आमच्या धर्मबांधवास सुचविणें हेंच वास्तविक प्रबोधनाचें आद्य कर्तव्य आहे. राजमार्गाच्या आमच्या सूचना इतर डळमळीत सुधारकांप्रमाणें मोहरी एवढी गोळी आणि बालदीभर पाणी अशा नाजूक होमिओपॅथिक मासल्याच्या केव्हांही नसणार. प्रबोधनाच्या सूचना म्हणजे थेट सर्जरीच्या (शस्त्रक्रियेच्या). पत्करल्या तर प्रयोग करून पहा. तात्काळ दुःखमुक्त व्हाल. नाहींतर होमिओपॅथिक गुळण्या, भटांचे संघटणीं काढे निकाढे, पुराणप्रवचनांच्या, लेक्चरबाजीच्या मलमपट्ट्या आणि पक्षोपपक्षांची वातविध्वंसक नारायण तेलें आहेतच. बसा चोपडीत जन्मभर! आमचा आजचा धर्म हा मुळीं धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारें एक पाजी थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेतर दुनिया माणूस असून पशूपेक्षांही पशू बनली आहे. त्यामुळें आमच्या सर्वांगीण हलाकीचें मूळ भटांच्या पोटांत आहे. त्यांच्या गोडबोल्या ओठांत नव्हे; हे शेंकडा दहा लोकांना पटतां पटतांच एक शतक काळाच्या उदरांत गडप झालें. भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडांत देवळांचा नंबर पहिला लागतो. देवळांची उत्पत्ति ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदुधर्माची ही अगदी अलिकडची कमाई आहे. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचें जे आलय – वसतिस्थान – ते देवालय. आमचें तत्त्वज्ञान पहावें तों देव `चराचर व्यापुनि’ आणखी वर `दशांगुळें उरला’. अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतीच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरांत येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती! बोरीबंदरवर उतरलेल्या नवख्या प्रवाशाला सभागृहांत किंवा ताजमहालांत जाण्याचा जसा प्रसंग येतो, तसा `चराचर व्यापूनी दशांगुळें उरलेल्या’ देवाला सारें जग ओसाड चाकून हिंदूंच्या देवळांतच ठाणें देण्याचा असा कोणता प्रसंग ओढवला होता नकळे. बौद्ध धर्म हिंदुस्थानांतून परागंदा होईपर्यंत (म्हणजे इसवी सनाचा उदय होईपर्यंत) तरी भारतीय इतिहासांत देवळांचा कोठेंच कांहीं सुगावा लागत नाहीं. मग तोंपर्यंत आमचे हे हिंदु देव थंडीवा-यांत कुडकुडत आणि उन्हातान्हांत धडपडत पडले तरी कोठें होते? विद्वान संशोधकांच्या मतें आर्यांच्या ऋग्वेदकाळाची गणना जास्तींत जास्त इसवी सनापूर्वी ७००० वर्षे धरलीं, तर इतकीं वर्षे हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठें? आजचा त्यांचा देवळांतला थाट पाहिला, तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचाईत पण या देवांना सकाळची न्याहरी, दुपारी पंचपक्क्वानांचे भरगच्च ताट, पुन्हा तीन प्रहरी टिफीन आणि रात्री जेवण! याशिवाय दिवस सुना जायचा नाहीं. याशिवाय काकडआरत्या, माकड आरत्या, धूपार्त्या, शेजार्त्या, आहेतच.
कोट्यवधि गोरगरीब हिंदूंना, विशेषतः धर्मश्रद्धाळु हतभागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यांत गोणपाटाचें ठिगळहि मिळण्याची पंचाईत; पण आमच्या देवांना छपरीपलंग, मच्छरदाणी, गाद्यागिरद्यांशिवाय भागायचेंच नाहीं. खुशालचेंडू श्रीमंताप्रमाणे असल्या अखंड ऐश्वर्यात लोळणा-या देवांची स्थिति देवळें निर्माण होण्यापूर्वी कशी असावी, याची प्रत्यक्ष प्रदर्शने म्हणून तर भिक्षुकशाहीच्या आद्य शंकराचार्यांनी महारवाडे, मांगवाडे, धेडवाडे व भंगीवाडे निर्माण करून ठेवले असावेत काय? आमची खात्री आहे कीं, देवळें नव्हतीं तेव्हां आमच्या देवांच्या नशिबी महारामांगाप्रमाणेंच मसणवटीची कर्मप्राप्त राहणी लागलेली असावी, या राहणींतून आपला उद्धार व्हावा आणि काकड-माकड आरत्यांचे आणि घंटानगा-याचें ऐश्वर्य आपणांस लाभावें, म्हणून आमच्या देवळ्या देवांनी भटांची खूप पायचाटी केली; तेव्हा भटांच्या वेदोक्त मेहरबानीनें त्यांना तुरुंग वजा देवळांतली भटमान्य राजविलासी राहणी लाभली. देवळें आणि देव यांची आज कशीं विल्हेवाट लावावी याचा विचार करण्यापूर्वी, या दोन संस्था मूळ अस्तित्वांत कशा आल्या, याची रूपरेषा वाचकांपुढे ठेवणें जरूर आहे. यासाठी आर्यसंस्कृतीच्या जोडीनेंच इजिप्त आणि मेसापोटेमियाकडे परिणत होत असलेल्या सेमेटिक लोकांच्या संस्कृतीचा प्राचीन इतिहास आपण संक्षेपानें समालोचन केला पाहिजे. आर्यांप्रमाणेंच सेमेटिक लोक गुरेंढोरें पाळून, आज

No comments:
Post a Comment